समर्थ रामदासांनी रचलेल्या करुणाष्टकांवर अरुण गोडबोले यांनी केलेले भाष्य म्हणजे हे पुस्तक आहे. अनेकदा ही करुणाष्टके आपल्या आजूबाजूला कानावर पडतात; मात्र त्यावरील भाष्य ती समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. समर्थरचित ३२ करुणाष्टाकांपैकी २२ करुणाष्टकांवरील भाष्य या पुस्तकात आहे.
‘रामरूप’, ‘उदासीन हा काळ कोठे न कंठे’, ‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया’ अशा अनेक नेहमी कानावर पडणाऱ्या करुणाष्टकांची नवी ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना होते. रोजच्या व्यावहारिक जगातील उदाहरणांचा, अनुभवांचा वापर करीत गोडबोले यांनी करुणाष्टकांचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : ८७
किंमत : १२६ रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)